आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील थोर आद्य समाजसुधारक संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Sant Eknath Maharaj यांच्या बद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

संत एकनाथ महाराज कोण होते
संत एकनाथ हे भारतीय हिंदू संत, तत्त्वज्ञ आणि भक्त-कवि होते. ते विठ्ठलाचे भक्त होते आणि वारकरी परंपरेतील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे. मराठी संत ज्ञानेश्वर आणि नामदेव यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून एकनाथांकडे अनेकदा पाहिले जाते.
एकनाथांनी चतुःश्लोकी भागवत, रुक्मिणीस्वयंवर, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण यांसारख्या श्रेष्ठ ग्रंथांची मराठीत रचना केली. त्यांनी रचलेला “एकनाथी भागवत” हा ग्रंथ म्हणजे भागवताच्या एकादशस्कंधावरील टीका असून त्याची ओवीसंख्या सुमारे एकोणीस हजार इतकी आहे.
संत एकनाथ यांची माहिती मराठी
इसवी सनाच्या सोळाव्या शतकात संत एकनाथांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्रात फडकवली. त्याच्या जन्मतारखेचा कोणताही विश्वसनीय पुरावा नाही. तथापि, त्यांचा जन्म शके १४२६ (इ.स. १५०४) मध्ये पैठण येथे झाला असे मानले जाते. काही अभ्यासकांच्या मते एकनाथांचा जन्म शके १४५५ मध्ये झाला.
एकनाथ हे प्रसिद्ध संत भानुदास यांचे नातू होते. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. पण एकनाथच्या बालपणीच आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले.
एकनाथांना लहानपणापासूनच हरिभक्तीची आवड होती. त्यामुळे वयाच्या बाराव्या वर्षी आजोबांच्या परवानगीशिवाय ते देवगडला गेले आणि जनार्दनस्वामींच्या सेवेत राहिले. अशाप्रकारे, सुमारे सहा वर्षांच्या कालावधीनंतर, गुरूंच्या कृपेने नाथला ‘सुलभ’ पर्वतावरील सद्गुणांची जाणीव झाली आणि ते आतून भक्तिमय झाले.
त्यानंतर जनार्दनस्वामी व एकनाथ ही गुरुशिष्यांची जोडी तीर्थयात्रेसाठी देवगडहून निघाली. या वेळी – पंचवटी एकनाथांनी जनार्दनस्वामींच्या आज्ञेवरून चतुःश्लोकी भागवतावर ओवीबद्ध टीका रचली. पुढे जनार्दनस्वामी देवगडास परतले आणि एकनाथांनी एकट्यानेच तीर्थयात्रा चालू ठेवली.
एकनाथांची तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर ते वयाच्या २५ व्या वर्षी पैठणला परत आले. त्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. काही काळ त्यांचे काशीक्षेत्रीही वास्तव्य होते . शके १५२१ (इ.स. १५९९) मध्ये त्यांनी पैठण येथे देह ठेवला.
संत एकनाथ महाराज अभंग, भारूड व ग्रंथरचना
एकनाथांनी चतुःश्लोकी भागवत, रुक्मिणीस्वयंवर, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण यांसारख्या श्रेष्ठ ग्रंथांची मराठीत रचना केली. त्यांनी रचलेला “एकनाथी भागवत” हा ग्रंथ म्हणजे भागवताच्या एकादशस्कंधावरील टीका असून त्याची ओवीसंख्या सुमारे एकोणीस हजार इतकी आहे.
या ग्रंथाद्वारे भागवत धर्माचे तत्त्वज्ञान त्यांनी मराठीत आणले. त्यांचे ‘ रुक्मिणीस्वयंवर ‘ हे श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या विवाहावरील आख्यानकाव्य तर खूपच लोकप्रिय ठरले. याशिवाय एकनाथांची भारूडे, त्यांच्या अभंगांची एकनाथी गाथा, पदे, गौळणी इत्यादी रचनादेखील विशेष प्रसिद्ध आहेत.
एकनाथांची भारूडे म्हणजे एक प्रकारची लोकगीतेच होत. सर्वसामान्य लोकांना त्यांच्याच जीवनातील व नित्याच्या व्यवहारातील दाखले देऊन परमार्थाची शिकवण देण्यासाठी एकनाथांनी गोंधळ्याची भूमिका स्वीकारून देवीला आवाहन करणारी बारा भारूडे लिहिली. भारूडरचनेत नवचैतन्य, विविधता व विपुलता आणण्याचे कार्य त्यांनी केले.
खंडोबाचे उपासक वाघ्या – मुरळी यांच्या भूमिका घेऊनही,
“मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी।
निःसंग मुरळी झाले।
या मालूचें (मल्हारीचें) घर रिघाले।।”
यांसारखी गीते नाथांनी रचली आहेत. एकनाथांनी गेय पदरचनाही केली आहे; तसेच बहुजन समाजासाठी काही कथात्मक रचनाही केल्या आहेत. एकनाथांनी आळंदीस जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. त्याचप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली. आज ज्ञानेश्वरीची हीच प्रत वारकरी संप्रदायात सर्वमान्य ठरली आहे.
एकनाथांनी प्रपंच व परमार्थ, अध्यात्म व समाजोद्धार यांची सांगड आपल्या जीवनात घातली होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व समन्वयवादी होते. त्यांच्या विचारप्रणालीत परंपरारक्षण आणि परमार्थातील भेदभावाचे निर्मूलन अशा दोन्ही प्रवृत्ती आहेत.
रा. द. रानडे म्हणतात, “प्रपंच व परमार्थ यांची विलक्षण सांगड घालून संसारामध्ये असतानाच परमार्थ कसा करावा, हे त्यांनी जसे आपल्या उदाहरणाने सर्व लोकांस शिकविले त्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही शिकविले नाही.”
एकनाथांच्या काव्यरचनेत आशयाभिव्यक्तीचे वैचित्र्य व वैपुल्य मोठ्या प्रमाणावर आढळते. गुरुभक्ती, पारमार्थिक अनुभव आणि सामाजिक स्थिती हे त्यांच्या अभंगांचे मुख्य विषय आहेत, त्यांनी जातिभेदावर प्रहार करून सामाजिक समतेचा पुरस्कार केला. आपल्या एका अभंगात ते म्हणतात,
“जया म्हणती नीच वर्ण।
स्त्री शूद्रादी हीन जन।।
सर्वाभूती देव वसे नीचा वयी काय नसे ।।”
एकनाथांचे जातिभेदविरोधी दृष्टिकोन स्पष्ट करणारे जोहारावरील अभंग मननीय आहेत . नाथांचे वाङ्मय वाचताना त्यांच्यातील समाजसुधारक आपणास ठायीठायी भेटल्यावाचून राहणार नाही.
आपली भारूडे व गौळणींच्या माध्यमातून त्यांनी विनोद, उपहास, उपरोध यांच्या साहाय्याने समाजजीवनातील दोषांचे मार्मिक दिग्दर्शन केले आणि सामान्य जनाना उपयुक्त मार्गदर्शनही केले.
“मोडकेसें घर तुटकेसें छप्पर।
देवाला देवघर नाहीं।
मला दादला नलगे बाई।।”
“किंवा”
“नणंदेचं कारटं किरकिर करतं।
खरुज होऊदे त्याला।
भवानी आई रोडगा वाहीन तुला।”
यांसारखी नाथांची भारूडे आजही जनसामान्यांना प्रिय आहेत.
ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांच्यानंतर काहीशा दुर्बल झालेल्या भागवत धर्माचे पुनरुज्जीवन केले. आपल्या भगवती टिकेने त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने भक्तीपंथाची स्थापना केली आणि त्या पंथाभोवती महाराष्ट्रातील बहुजन समाज संघटित केला.
अशा प्रकारे एकनाथांनी भागवत धर्माला शास्त्र आणि समाज असा दुहेरी दर्जा देऊन तो लोकप्रिय केला. म्हणूनच एकनाथांबद्दल असे म्हटले जाते की त्यांनी दिव्य जीवनाचे चिंतन करताना सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक संकल्पना गमावल्या नाहीत.
हे सुद्धा वाचा –