शेअर बाजार सिक्युरिटीजच्या असंख्य खरेदीदारांना आणि विक्रेत्यांना भेटण्याची, संवाद साधण्याची आणि व्यवहार करण्याची परवानगी देतो. Share Market कॉर्पोरेशनच्या शेअर्ससाठी किंमत शोधण्याची परवानगी देतात आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठी बॅरोमीटर म्हणून काम करतात. शेअर बाजाराला Stock Market आणि Equity Market देखील म्हटले जाते. या लेखात आपण Share Market म्हणजे काय आणि शेअर मार्केट कसे कार्य करते हे सविस्तर बघूया.

शेअर मार्केट म्हणजे काय
निरनिराळ्या प्रकारच्या शेअर्सची (भागांची) व रोख्यांची खरेदी-विक्री करणे व अशा रोख्यांच्या खरेदी आणि विक्रीव्यवहारांचे नियमन करण्यासाठी स्थापण्यात आलेल्या व्यावसायिक संस्थेला (म्हणजेच व्यक्तींच्या संघटनेला) शेअर बाजार (Share Market) या नावाने संबोधिले जाते. शेअर बाजाराची व्याख्या पुढीलप्रमाणेही केली जाते “ज्या ठिकाणी किंवा ज्या बाजारात संयुक्त भांडवली औद्योगिक कंपन्यांचे व त्याप्रमाणे सरकारी व निमसरकारी रोख्यांच्या खरेदी आणि विक्रीचे व्यवहार केले जातात. तो बाजार म्हणजे शेअर बाजार (म्हणजेच रोखे बाजार) होय.”
सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन एक्ट, 1956 ने शेअर बाजाराची व्याख्या पुढील शब्दांत केली आहे. “शेअर बाजार म्हणजे कोणताही नोंदविलेला किंवा न नोंदविलेला व्यक्तिसमूह किंवा संस्था होय. या संस्थेचे किंवा समूहाचे मुख्य कार्य म्हणजे भागांच्या कर्जरोख्यांच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, नियमन करणे व त्यांना मदत करणे.”
Share Market, म्हणजे एक अशी संस्था जिथे मानव आणि संगणक कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री करतात. शेअर बाजाराचा संदर्भ व्यापकपणे एक्सचेंजेस आणि इतर ठिकाणांचा संग्रह आहे जेथे सार्वजनिकरित्या आयोजित केलेल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी, विक्री आणि जारी केले जातात. अशा आर्थिक क्रियाकलाप संस्थात्मक औपचारिक देवाणघेवाण किंवा ओव्हर-द-काउंटर (OTC) मार्केटप्लेसद्वारे आयोजित केले जातात जे नियमांच्या परिभाषित संचा अंतर्गत कार्य करतात.
Share Market सिक्युरिटीजच्या असंख्य खरेदीदारांना आणि विक्रेत्यांना भेटण्याची, संवाद साधण्याची आणि व्यवहार करण्याची परवानगी देतो. स्टॉक मार्केट कॉर्पोरेशनच्या शेअर्ससाठी किंमत शोधण्याची परवानगी देतात आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठी बॅरोमीटर म्हणून काम करतात. शेअर बाजारातील सहभागींची संख्या मोठी असल्याने, एखाद्याला वाजवी किंमत आणि उच्च तरलतेची खात्री देता येते कारण विविध बाजारातील सहभागी सर्वोत्तम किंमतीसाठी एकमेकांशी स्पर्धा करतात.
शेअर बाजार म्हणजे देशातील भांडवल बाजाराचा गाभाच होय. शेअर बाजारामुळे अधिकाधिक नफा देणाऱ्या शेअरमध्ये भांडवल गुंतविणे शक्य होते. त्या बाजारामुळे भांडवलाला गतिमानता प्राप्त होते. देशाची आर्थिक (आणि औद्योगिक) स्थिती किती गतिमान आहे किंवा मंदीकडे झुकते आहे, हे शेअर बाजारातील घटनांवरून दर्शविले जाते. त्या अर्थाने शेअर बाजार किंवा रोखे बाजार म्हणजे देशात अस्तित्वात असलेल्या आर्थिक परिस्थितीचे यथार्थ दर्शन घडविणारा आरसाच होय.
कोणते उद्योग किंवा कोणत्या औद्योगिक कंपन्या ऊर्जितावस्थेत आहेत व कोणत्या तोट्यात चालल्या आहेत व म्हणूनच कोणत्या शेअर्सची किंवा रोख्यांची खरेदी करावयाची व कोणते रोखे विकावयाचे हे या बाजारातील घडामोडीमुळे भांडवल गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना समजून येते.
शेअर्स (Shares)
शेअर्स (Shares), हे कंपनीचे छोटे तुकडे असतात. शेअर्स मानव, कंपन्या आणि Mutual Funds द्वारे खरेदी केले जाऊ शकतात. एखाद्या कंपनीचे Shares खरेदी करताना, खरेदीदार त्या कंपनीचा एक छोटासा भाग मालक असतो. शेअरची किंमत अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित असू शकते. किंमतीवर परिणाम करणारी मुख्य गोष्ट म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्यातील संतुलन. जर अनेक खरेदीदारांना स्टॉक खरेदी करायचा असेल तर किंमत वाढते. खरेदीदारांपेक्षा अधिक विक्रेते असल्यास, किंमत कमी होते.
स्टॉक ब्रोकर (Stock Broker)
काही खरेदीदार स्टॉक ब्रोकर (Stock Broker) द्वारे शेअर्समध्ये शेअर्सचा व्यापार करतात. स्टॉक ब्रोकर ही अशी व्यक्ती असते जी त्यांच्या ग्राहकांसाठी स्टॉकची खरेदी किंवा विक्री करते. स्टॉक ब्रोकर ग्राहकांना स्टॉकमध्ये निवड करण्यात मदत करू शकतो. त्यांचा सल्ला कंपन्यांच्या सार्वजनिक माहितीवर आधारित असतो.
शेअर बाजारांतील व्यवहारांचे स्वरूप (Stock Market or Exchanges Transactions)
शेअर बाजारातील व्यवहार त्या बाजारासंबंधी करण्यात आलेल्या कायद्यानुसार व त्या कायद्याद्वारे करण्यात आलेल्या नियमानुसार केले जातात. ‘रोखे करार (नियमन) कायदा’ भारतातील रोखे बाजारातील व्यवहारांचे नियमन करतो. भारतातील रोखे बाजारांत रोख्यांच्या यादीत समाविष्ट (Listed) रोख्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात, असे व्यवहार रोखे बाजाराने परवानगी दिलेल्या सभासदांना किंवा त्यांच्या संमतीने कार्य करणाऱ्या प्रतिनिधींनाच कार्यालयाने ठरविलेल्या कालावधीत करावे लागतात.
सर्वसाधारणपणे रोखे बाजारात रोख्यांचा व्यवहार करण्याच्या दोन पद्धती आहेत रोख्यांचे व्यवहार झाल्याबरोबर त्यांचे ताबडतोब हस्तांतर करणे; किंवा भावी काळात खरेदी केलेल्या रोख्यांचे हस्तांतर करण्याचा करार करणे. ताबडतोब रोख्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार संबंधित करारानुसार त्याच दिवशी पूर्ण केले पाहिजेत किंवा जास्तीत वास्त सात दिवसांच्या मुदतीत पूर्ण केले पाहिजेत, अशा रोख्यांच्या व्यवहाराला रोखीचा व्यवहार’ (Cash Transaction) असेही म्हणतात. अशा ताबडतोब हस्तांतर करावयाचे रोख्यांच्या व्यवहार रोखे बाजारात निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही रोख्यांच्या बाबतीत करता येतात.
पण भावी काळात हस्तांतरित करावयाचे रोख्यांचे व्यवहार (Future Delivery Contract) अशा व्यवहारासाठी केलेल्या यादीत समाविष्ट असलेल्या रोख्यांच्या बाबतीतच करता येतात.
राष्ट्रीय शेअर बाजाराचे फायदे (Benefits of Stock Market)
- प्रतिभूती चे प्रचालन सहजतेने आणि तत्परतेने होते.
- गुंतवणूकदारांना संगणकावर व्यवहाराचे प्रत्यक्ष पुष्टीकरण बघावयास मिळते.
- राष्ट्रीय स्तरावरील संगणकप्रणालीवर हे व्यवहार होत असल्यामुळे या व्यवहारांच्या पारदर्शकतेची खात्री असते.
- या पद्धतीत खरेदी-विक्री व्यवहार किमान वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असल्यामुळे समभागाच्या व्यापारी व्यवहाराच्या खर्चात कपात होते.
- राष्ट्रीय शेअर बाजाराच्या इलेक्ट्रॉनिक्स जाळ्यामुळे गुंतवणूक व्यवहारांची सुविधा देशभर पसरवता येते.
- मध्यवर्ती कोष स्थापन केलेला असल्यामुळे व्यवहारांची पुस्तकामधील नोंद आणि प्रमाणपत्राचे चलन सोपे होते.
- अनेक कंपन्यांनी आपली नावे राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये नोंदविलेली आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अशा कंपन्यांच्या प्रतिभूती चा व्यापार एकाच वेळी मुख्य आणि प्रादेशिक शेअर बाजारात होत असतो.
शेअर बाजारातील सट्टेबाजी (Stock market Betting)
बाजारातील खरेदी-विक्री व्यवहारामागे दोन उद्दिष्टे असतात. एक उदिष्ट म्हणजे ठरावीक काळात खात्रीशीर व ठरविलेले उत्पन्न देण्याचे साधन म्हणून रोख्यांची खरेदी करणे. या कारणासाठी रोखे खरेदी करणाऱ्यांना रोख्यांची पूर्ण रोखे किंमत देऊन व्यवहार पूर्ण करावा लागतो.
रोख्यांच्या व्यवहारांतील दुसरा उद्देश म्हणजे सट्टेबाजी करून नफा मिळविणे. रोख्यांच्या किमती सापेक्षतेने खाली असताना विशिष्ट रोखे खरेदी करणे व अपेक्षेप्रमाणे त्यांची किंमत वाढली तर त्या वेळी चढ्या किमतीस रोखे विकून खरेदी किंमत व विक्री किंमत यांमधील फरक नफा म्हणून मिळविणे.
सट्टेबाजीसाठी रोख्यांचा व्यवहार करणाऱ्यांना रोख्यांच्या खरेदीच्या वेळी त्यांची बाजारातील पूर्ण किंमत द्यावी लागत नाही. फक्त काही रक्कम संबंधितांकडे ठेवावी लागते. रोखे बाजारातील व्यवहारात असे आढळून आले आहे की, सट्टेबाजीसाठी केलेल्या रोख्यांच्या व्यवहारांची संख्या फक्त गुंतवणुकीसाठी केलेल्या रोख्यांच्या व्यवहारपेक्षा कितीतरी पट अधिक असते.
सट्टेबाजी (चांगल्या अर्थाने) रोख्यांच्या बाजारात महत्त्वाची कामगिरी करू शकते. जर सट्टेबाजीचे रोख्यांचे व्यवहार भविष्यकाळात घडणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील घटनांच्या तर्कशुद्ध विश्लेषणावर आधारलेले असतील तर कशा सट्टेबाजांकडून रोख्यांच्या बाजारात महत्त्वाचे कार्य होऊ शकते.
रोखीने व गुंतवणुकीच्या दृष्टीने रोख्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांची संख्या सापेक्षतेने अल्प असते तर सट्टेबाजारांचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालतात; त्यामुळे रोखे बाजारात एक प्रकारचे सातत्य निर्माण होते व व्यवहारात रोख्यांच्या खऱ्या किमती किंवा मूल्ये प्रतीत होतात; म्हणूनच समाजाकडून केली जाणारी गुंतवणूक योग्य प्रकारे केली जाण्यास मदत होते. रोख्यांच्या किमतीत व त्यांच्या बदलात एक प्रकारचे सातत्य राहते व सट्टेबाजीच्या व्यवहारांमुळे रोखे बाजाराचे दैनंदिन कार्य कार्यक्षम रीतीने सतत चालू राहण्यास मदत होते.
वरील विश्लेषणात एक गोष्ट गृहीत धरली आहे की, अशा तन्हेचे सट्टेबाजीचे व्यवहार चालू औद्योगिक व आर्थिक परिस्थितीत व त्यात भावी काळात घडून येणारे अपेक्षित बदल यांच्या प्रदीर्घ अभ्यासावर आधारलेले असतात. तसे जर नसेल तर रोखे बाजारातील सट्टेबाजीचे व्यवहार आणि जुगार किंवा लॉटरी यांत काहीच फरक राहणार नाही. अशा तन्हेने जुगार म्हणून केलेल्या रोखे बाजारातील व्यवहारांमुळे कित्येक अनिष्ट परिणाम घडून येणे संभवते.
रोखे बाजारातील सट्टेबाजांचे प्रकार
रोखे बाजारातील सट्टेबाजांचे तीन प्रकार आढळतात-
1. Bull-पुढे वाढत्या किमतीत रोखे विकून फायदा करून घेता येईल म्हणून रोखे विकत घेणे.
2. Bear-भावी काळात रोख्यांच्या किमती पडतील म्हणून आजच रोखे विकणे.
3. काही सट्टेबाज रोखे बाजारात अस्तित्वात असलेले रोखे विकत घेत नाहीत किंवा विकतही नाहीत, तर ते फक्त नव्याने स्थापन झालेल्या उत्पादनसंस्थांचे भाग किंवा रोखे विकत घेतात. त्यामागील उद्देश म्हणजे भावी काळात ते भाग किंवा रोखे चढ्या भावाने विकून फायदा करून घेण्याची योजना हा होय.
भारतातील रोखे बाजाराचे व्यवस्थापन (Management of Stock Market in India)
सन 1956 मध्ये ‘रोखे करार कायदा’ (Securities Contract Act, 1956) पास करण्यात आल्यानंतर, फक्त मध्यवर्ती सरकारने मान्यता दिलेले रोखे बाजारच कार्य करू शकतील. म्हणजेच सरकारच्या मान्यतेशिवाय रोखे बाजार (म्हणजेच शेअर बाजार) अस्तित्वात येऊन कार्य करू शकणार नाहीत.
मध्यवर्ती सरकारचे धोरण असे दिसते की, प्रत्येक भौगोलिक क्षेत्रासाठी फक्त एकच रोखे बाजार असावा. सच्या भारतात पुढील ठिकाणी रोखे बाजाराचे कार्य चालू आहे. मुंबई, दिल्ली, मद्रास, कोलकता, बंगळुरु, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, कानपूर, कोचीन आणि पुणे, जयपूर, लुधियाना आणि राजकोट येथे रोखे बाजार स्थापन झाल्यानंतर भारतातील रोखे बाजारांची एकूण संख्या 14 होणार आहे. एकूण व्यवहारांच्या दृष्टीने पाहता मुंबई व कोलकता येथील रोखे बाजार महत्त्वाचे ठरतात.
रोखे बाजाराचे कार्य कार्यकारी समितीद्वारा (म्हणजेच व्यवस्थापक समितीद्वारा) चालविले जाते. या समितीवर सरकारने नेमलेल्या सदस्यांची कमाल मर्यादा तीन इतकी असते. रोखे बाजारातील कार्य नियम व अधिनियमानुसार चालते व हे नियम सरकारने घातलेल्या अटींशी सुसंगत असावे लागतात.
जरूर वाटल्यास रोखे बाजाराची मान्यता सरकार काढून घेऊ शकते किंवा कार्यकारिणी बरखास्त करून आपण नेमलेल्या व्यक्तीकडे विशिष्ट कालावधीपर्यंत रोखे बाजारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपवू शकते. वरील व्यवस्था करताना भागधारकांचे व सभासदांच्या हिताचे रक्षण करणे व रोखे बाजारातील व्यवहार योग्य व कायदेशीर रीतीने चालतात याची खात्री करून घेणे हे उद्दिष्ट असते.
संदर्भ: भारतीय अर्थव्यवस्था
हे सुद्धा वाचा –